Sunday, August 2, 2009

हे वयच असं असतं...!


हे वयच असं असतं...!

हे वयच असं असतं,झगडण्याचं,

काहीतरी चांगलं करून दाखवण्याचं,

बाहेरच्या जगात उतरून,निर्भेळ यश वेचण्याचं.....
हे वयच असं असतं,

आकांक्षा बाळगण्याचं,

सुंदर स्वप्न पाहण्याचं,

या स्वप्नात रंग भरूनते प्रत्यक्षात उतरवण्याचं.....
हे वयच असं असतं,
धावण्याचं,
धावता-धावता अडखळण्याचं,
आणि नव्या जोमानं कामाला लागण्याचं.....
हे वयच असं असतं,
भरारी मारण्याचं,
उंच उंच झेप घेण्याचं,
उत्तुंग नभाच्या कुशीत,
दिमाखानं उडण्याचा आनंद घेण्याचं.....
हे वयच असं असतं,
क्रांती घडवण्याचं,
प्रगती करण्याचं,
जीवनाला आकार देऊन,आनंदानं जगण्याचं... !!!
हे वयच असं असतं...! हे वयच असं असतं...!

तुझ्या आठवणींच्या वाटेवरती...


तुझ्या आठवणींच्या वाटेवरती एक वाडा लागला..

ओळखीचामोडुनही तो हसतच होता...

गर्द रंग चढऊनी काजळीचा
त्याच्या तुटलेल्या सांध्यांवरती एक पारवा गीत

ओळखीचं गात होताशब्दन-शब्द स्मरणातलेच होते...

अन सुरही तो ओळखीचाच होता ...
त्या पारव्यास मी विचारलेकसला रे हा आक्रोश आहे???

पेटला हा वाडा कशाने???

यात कूणाचा रे हा दोष आहे?

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोससोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस

भावनांचं मोल जाण..

मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं

जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस

व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

पाणावलेल्या कडा म्हणतातविसरु नकोस मला,

ओठांवरच स्मित म्हणतआठ्वेलच मी तुला!!

सुकलेली पाने गळतात नावारा सुटल्यावर

तशी तुझी स्वप्न पडतातमी डोळे मिटल्यावर

जे स्वप्न कदीही सत्य होनार नाहीते स्वप्न बघत आहे मी

तु ज्या रस्त्या वरुन जात नाही

त्या रस्त्यावर तुज़ी वाट बघत आहे मी

जीवन आणी जीणे यातलेआता कळाले अंतर...

काही तु येण्यापूर्वी....काही तु गेल्या नंतर...!!

आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे....


नाव बुडण्याआधी किनारा पाहून घेजो

नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे,,,

माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात

मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे...
जेवढं रडायचं आहे आज रडून घेज्या

शपता सोडायच्या त्या सोडून घेआठवणीशीवाय काहीच नाही

माझ्याकडेआणखी काही हवं असेल तर मागुन घे
आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे

आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे....

मैत्री असावी अशी...


मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी
हसत राहणारी.., हसवत राहणारी...
संकटकाळी हात देणारी...
आनंदी समयी साद घालणारी...
मनाची कवाडे उघडून डोकावणारी...
काहीं गुपितांचे राखण करणारी...
मन मोकळे करुन सारं सांगणारी...
सांगता सांगता मोहीत करणारी...
कधी कुणाला न लुटणारी...
चांगल्याच कौतुक करणारी...
तितकीच चूका दाखविणारी...
शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी...,
मैत्री असावी अशी...

मैत्री म्हटली की !!!


मैत्री म्हटली कीआठवतं ते बालपणआणि मैत्रीतुन मिळालेलंते खरंखुरं शहाणपण
कोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातंसगळ्या नात्यांत श्रेष्ठहे नातं टिकवण्यासाठीनकोत खुप सारे कष्ट
मैत्रीचा हा धागारेशमापेक्षाही मऊ सुतमैत्रीच्या कुशीतच शमतेमायेची ती सुप्त भुक
मैत्रीच्या सहवासातश्रम सारे विसरता येतातपण खरे मित्र मिळवण्यासाठीकाहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजेरखरखत्या उन्हात मायेची सावलीसुखाच्या दवात भिजुनचिंब-चिंब नाहली
मैत्रीचे बंधकधीच नसतात तुटणारेजुन्या आठवणींना उजाळा देउनगालातल्या गालात हसणारे…

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही......


म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,भेटायच्या जागा चाट-रूम असतात,कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
दिसले कि हाय, जाताना बायपण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
आज इथे उद्या तिथे……… कोणासाठी कोणी थांबणार नाहीकोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
शब्दच हल्ली अर्थ विसरतात,संवेदनाच हल्ली बधीर होतात,भावनाच हल्ली बोथट होतात,अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,,,,

मैत्रीच्या पावसात....


मैत्रीच्या पावसाताकाल म्हटलं पावसाला,माफ कर बाबा,आज भिजायला जमणार नाही.
मैत्रीच्या पावसात भिजूनझालोय ओलाचिंब.
न्हा‌ऊ घालतोय बघ मलाशुभेच्छांचा प्रत्येक थेंब
मित्रांची इतकी गर्दी झालीयभिजून भिजून बघ मला सर्दी झालीय
पा‌ऊस रिमझिम हसला.ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला.
जाता जाता म्हणाला,“काळजी नको. भिजून घे खूप.भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब …!

मैत्रीच्या पावसात....

मैत्रीच्या पावसाताकाल म्हटलं पावसाला,माफ कर बाबा,आज भिजायला जमणार नाही.
मैत्रीच्या पावसात भिजूनझालोय ओलाचिंब.
न्हा‌ऊ घालतोय बघ मलाशुभेच्छांचा प्रत्येक थेंब
मित्रांची इतकी गर्दी झालीयभिजून भिजून बघ मला सर्दी झालीय
पा‌ऊस रिमझिम हसला.ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला.
जाता जाता म्हणाला,“काळजी नको. भिजून घे खूप.भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब …!